राजस्थानमध्ये केमिकल फॅक्टरीच्या आगीत 7 लोक जिवंत जळाले

भिवाडी :

राजस्थानमध्ये भिवाडी (खैरथल-तिजारा) येथील केमिकल फॅक्टरीत 7 लोक जिवंत जळाले. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 10 हून अधिक मजूर अजूनही अडकले आहेत. घटनेच्या वेळी सुमारे 25 मजूर काम करत होते. हा अपघात खुशखेड़ा करौली औद्योगिक परिसरात सोमवारी सकाळी झाला. पोलिसांना गस्तीवर असताना घटनेची माहिती मिळाली. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. आगीच्या ज्वाळा पाहून काही मजूर सुरक्षित बाहेर पडले. खुशखेड़ा अग्निशमन दल आणि भिवाडी रीको स्टेशनमधून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले .घटनास्थळी तिजारा डीएसपी शिवराज सिंह उपस्थित आहेत. त्यांनी चौकशी सुरू केली आहे. भिवाडी एसपी आणि एडीएम देखील लवकरच घटनास्थळी पोहोचणार आहेत.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!