गंधारीतील जिल्हा परिषद शाळेत पाणी साचले

वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष, पालकात तीव्र संताप

 

लोणार

तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंधारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. शाळेच्या आवारात सुमारे तीन ते चार फूट पाणी साचल्याने वर्गखोल्यांपर्यंत पाणी पोहोचले असून शाळेचे कामकाज विस्कळीत झाले.

स्थानिक ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापनाने यापूर्वीच पाणी साचण्याच्या समस्येबाबत संबंधित प्रशासनाकडे लेखी निवेदने दिल्याचा दावा केला आहे. मात्र, आवश्यक उपाययोजना वेळेत न झाल्याने यंदाही शाळेला जलमय स्थितीचा सामना करावा लागल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

शिक्षण खंडित होऊ नये म्हणून अनेक पालकांनी मुलांना शाळेत पाठविले; मात्र वर्गखोल्यांजवळ पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बसविणे शक्य झाले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परत घरी जावे लागले, परिणामी शैक्षणिक नुकसान झाले.दोन दिवसांपासून तुंबलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाणही वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाण्याचा तातडीने निचरा करून जंतुनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, संबंधित प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन शाळा परिसरातील पाणी काढण्याबरोबरच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी निचरा व्यवस्था उभारण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!