मुलीला वाचवण्यासाठी पाच जणांनी घेतली नदीत उडी, पाच ही बुडाले, मुलगी वाचली

 कर्नूल

आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्हा येथे मानवतेला सलाम करायला लावणारी, पण तितकीच हृदयद्रावक घटना घडली आहे. नदीत वाहून जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला वाचवण्यासाठी पाच जणांनी जीवाची पर्वा न करता उडी घेतली; मात्र दुर्दैवाने त्या पाचही जणांना आपला जीव गमवावा लागला. ही घटना मंत्रालयम परिसरातील तुंगभद्रा नदीत शनिवारी सायंकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन मुलगी नदीकाठी पाय धुत असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडली. नदीच्या प्रवाहात ती वाहून जाऊ लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. मुलीला वाचवण्यासाठी प्रथम एक युवक नदीत उतरला. त्यानंतर आणखी चार जणांनीही मदतीसाठी उडी घेतली. अखेर मुलीचा जीव वाचवण्यात यश आले; मात्र जोरदार प्रवाहामुळे पाचही जण पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. SDRF च्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली असून मृतदेहांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मृतांमध्ये शेजारच्या गावांतील नागरिकांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, एका मुलीचा जीव वाचवताना पाच जणांनी दिलेल्या बलिदानाची चर्चा सर्वत्र होत आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!